Jio recharge prices देशातील सर्वात मोठी दूरसंचार कंपनी असलेल्या रिलायन्स ज्यो ने ३ जुलैपासून मोबाईल रिचार्जच्या दरा वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. या वाढीचा फटका ग्राहकांना बसणार असून, ज्यो ने जवळपास अडीच वर्षांनी पहिल्यांदाच मोबाईल सेवेच्या दरात वाढ केली आहे.
जिओ चे अध्यक्ष आकाश अंबानी यांनी या दर वाढीचे कारण स्पष्ट करताना म्हटले आहे की, “नवीन योजनांची सुरूवात, इंडस्ट्री इनोव्हेशनला पुढे नेण्यासाठी तसंच 5G आणि एआय टेक्नॉलॉजीमध्ये गुंतवणुकीच्या माध्यमातून पर्यावरणपूरक वाढीचा पाठपुरावा करण्याच्या दिशेने हे एक पाऊल आहे.”
वाढीची कारणे जिओ कंपनीने रिचार्ज दरात वाढ करण्याचे काही कारणे दिली आहेत. त्यामध्ये सर्वात महत्त्वाचे म्हणजे कंपनीची 5जी व एआय तंत्रज्ञानावरील गुंतवणूक आणि नवीन योजनांची सुरूवात. या गुंतवणुकीतून कंपनी ऊर्जा दक्ष व पर्यावरणपूरक वाढ साध्य करण्याचा प्रयत्न करत आहे.
याशिवाय, मोठ्या प्रमाणावर इंडस्ट्रीतील इनोव्हेशनला चालना देण्याचाही उद्देश कंपनीचा आहे. त्यामुळे ग्राहकांकडून काही अतिरिक्त खर्च वसूल करण्याची गरज कंपनीला वाटत असावी.
नवीन रिचार्ज प्लॅनचे तपशील जिओ कंपनीने जवळपास सगळ्याच प्लानच्या किंमती वाढवल्या आहेत. सगळ्यात छोट्या रिचार्जची किंमत वाढून 19 रुपये करण्यात आली आहे, जो एक जीबी डेटाचा ‘ऍड ऑन पॅक’ आहे. या प्लानची आधीची किंमत 15 रुपये होती. ही वाढ जवळपास 25 टक्के आहे.
75 जीबी पोस्टपोड डेटा प्लानची किंमत 399 रुपयांनी वाढून 449 रुपये होणार आहे. तसंच ज्यो ने 84 दिवसांच्या व्हॅलिडिटीच्या अनलिमिटेड प्लानची किंमत 20 टक्क्यांनी वाढवली आहे. हा प्लान आता 799 रुपयांना असेल जो आधी 666 रुपयांना मिळायचा.
वार्षिक रिचार्जच्या प्लानची किंमत 20 ते 21 टक्के वाढवण्यात आली आहे. हा प्लान 1,559 रुपयांवरून आता 1,899 रुपये आणि 2,999 रुपयांवरून 3,599 रुपये होईल. तसंच सगळ्या 2 जीबी प्रतिदिवस आणि त्याच्यापेक्षा जास्तच्या प्लानवर अनलिमिटेड 5 जी डेटा उपलब्ध राहिल. नवीन किंमत 3 जुलै 2024 पासून लागू होतील, असं कंपनीकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
या सर्व नवीन किंमती ३ जुलै २०२४ पासून लागू होतील, असं कंपनीने स्पष्ट केले आहे. रिलायन्स ज्यो ही भारतातील सर्वात मोठी दूरसंचार कंपनी आहे. कंपनीने गेल्या काही वर्षांत ग्राहकांना मोफत आणि स्वस्त दरात मोबाईल सेवा उपलब्ध करून टेलिकॉम क्षेत्रात अनेक क्रांतिकारी बदल आणले आहेत.
पण आता कंपनीला आपल्या नवीन योजना राबविण्यासाठी व नवनवीन तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी अतिरिक्त उत्पन्नाची गरज वाटत असल्याने ग्राहकांना दरवाढीचा फटका बसणार आहे. कंपनीच्या या निर्णयामुळे एकूणच टेलिकॉम क्षेत्रातील सेवादरांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.